☺ मैत्री ☺
☺ मैत्री ☺ म्हणतात मैत्रीच नातं असतं सर्वात महान पण वाटतंय आता ओसाड झालंय माळरान खुप नाजुक असतं हे बंधन विश्वासाचं पाण्यासारखं नितळ नातं असतं दोन जीवांच निभवन अन टिकवण असतं खुप भयान...... वाटतंय आता ओसाड झालंय माळरान........ सुख - दुःख सांगण्यास होती एक सोबत जशी आयुष्याच्या वाटेवर होती एक परिपूर्ण संगत पण , का झाली मग मन अशी गुमान........ वाटतंय आता ओसाड झालंय माळरान........ आयुष्याच्या एकेकाळी त्याच माळरानी कळया होत्या फुलत झाडे होती झूलत पाखरांची किलबिल ऐकत होते हे कान........ वाटतंय आता ओसाड झालंय माळरान........ आठव